मुंबई : वेस्ट इंडिज दौ-यासाठी टीम इंडिया रवाना झाली. मंगळवारी रात्री उशिरा मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून टीम इंडिया रवाना झाली. प्रशिक्षक अनिल कुंबळेच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेस्ट इंडिजमध्ये टीम इंडिया 4 कसोटी सामने खेळणार आहे. पहिला सामना 21 जुलैला खेळवला जाईल. त्यापूर्वी सराव सामने देखील होणार आहेत.


भारतीय संघ पहिला प्रॅक्टिस मॅच 9 जुलैला सेंट किट्समधील वार्नर पार्कवर खेळणार आहे जो २ दिवसाची असेल. यानंतर 14 जुलैला ते 16 जुलै दरम्यान वार्नर पार्कवरच तीन दिवसीय मॅच खेळली जाणार आहे.