हैदराबाद : विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा तिसरा यशस्वी कर्णधार बनण्याच्या मार्गावर आहे. बांगलादेशविरुद्धचा एकमेव कसोटी सामना भारताने जिंकल्यास कोहलीच्या नावे आणखी एक नव्या विक्रमाची नोंद होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय संघाने हा सामना जिंकल्यास विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा २३ पैकी १५वा विजय असेल. त्यासोबतच मोहम्मद अझरुद्दीननंतर विराट भारताचा तिसरा यशस्वी कर्णधार ठरेल. 


अझहरने आपल्या नेतृत्वाखाली ४७ कसोटींमध्ये १४ कसोटी जिंकल्या होत्या. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीने ६० कसोटींमध्ये २७ सामने जिंकले होते. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताने ४९ कसोटींपैकी २१ सामने जिंकले होते.