रांची - गेल्या कसोटीत उंचावलेली आमची कामगिरी धर्मशाळा कसोटीतही कायम राहील, असं कर्णधार विराट कोहली विश्वासाने सांगतोय.
 
रांचीतील संघाच्या कामगिरीवर कर्णधार कोहली समाधानी आहे. ऑस्ट्रेलियाविरुध्दचा कसोटी सामना भारतच जिंकेल, असा त्याला विश्वास आहे. हा सामना अटीतटीचा होणार, यात शंका नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय संघ सध्या तिन्ही प्रकारात उच्च् स्तरावर आहे. ऑस्ट्रेलियाही आपलं नाव आणि प्रतिष्ठा टिकवून आहे.


रांची कसोटीत दोन्ही देशांच्या सर्व खेळाडूंनी आपली सर्वोत्त्म कामगिरी केली. त्याचमुळे हा सामना इतका अटीतटीचा होऊ शकला. 


पत्रकारांशी बोलताना विराटनं सांगितलं की, टीम इंडीया ऑस्ट्रेलियाला मुकाबला देण्यासाठी तयार आहे. हा सामना २५ ते २९ मार्चदरम्यान होईल.