मुंबई: विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर यांच्या मैत्रीबद्दल आपण नेहमीच ऐकलं आहे. पण या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सारं काही आलबेल आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रश्न विचारायचं कारण म्हणजे विनोद कांबळीनं केलेलं ट्विट. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रामध्ये असलेल्या दुष्काळामुळे आयपीएलचे सामने बाहेर नेण्याचे आदेश हायकोर्टानं दिले, यावर कांबळीनं ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातला दुष्काळ आणि आयपीएलबाबत भारतरत्न सचिन तेंडुलकर उत्तर द्यायला योग्य व्यक्ती आहे, असं कांबळी म्हणाला आहे. 


 



याआधीही कांबळीनं सचिनवर निशाणा साधला होता. माझ्या कठीण समयी सचिननं मला अपेक्षित असलेला पाठिंबा दिला नाही, असं वक्तव्य कांबळीनं सच का सामना या शोमध्ये केलं होतं. 


२०१३ ला वानखेडे स्टेडियमवर सचिन शेवटचा सामना खेळला, या मॅचसाठी सचिननं कांबळीला आमंत्रण दिलं नव्हतं. यामुळेही अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.