नवी दिल्ली : आयपीएलच्या दहाव्या हंगामाला गुरुवारपासून धमाकेदार सुरुवात झालीये. रॉयल चॅलेजर्स बंगळूरु आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्या रंगलेल्या सामन्यात हैदराबादने बाजी मारली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यात युवराज सिंगने धमाकेदार खेळी केली. या खेळीचे कौतुक आरसीबीच्या विराट कोहलीने खुलेपणाने केले. विराट सध्या दुखापतीमुळे आयपीएलच्या सामन्यांत खेळत नसला तरी संजय मांजरेकर यांच्यासोबत दिलेल्या मुलाखतीत त्याने आपला आनंद व्यक्त केला. 


युवराजने आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात ६२ धावांची धुंवाधार खेळी केली. यामुळे आरसीबीला ३५ रन्सनी हरवता आले. युवराजच्या या खेळीबाबत बोलताना कोहली म्हणाला युवराजने त्याचा हा फॉर्म चॅम्पियन ट्रॉफीपर्यंत कायम राखल्यास टीम इंडियाला त्याचा मोठा फायदा होईल.