मुंबई: रनचा पाठलाग करताना विराट कोहली हा सचिनपेक्षा ग्रेट आहे, असं वक्तव्य भारताचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीनं केलं आहे. टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाचा पराभव करून सेमी फायनलमध्ये धडक मारली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरवातीला 3 विकेट पडल्यानंतरही कोहलीच्या 51 बॉलमध्ये 82 रनच्या खेळीनं भारतानं 161 रनचं आव्हान पार केलं. यानंतर विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 


यामध्ये आता सौरव गांगुलीची भर पडली आहे. सचिन हा सर्वोत्तम आहे, पण जेव्हा स्कोर चेस करायची वेळ येते तेव्हा कोहली सचिनपेक्षा महान आहे, असं दादा म्हणाला आहे.