चेन्नई : चेन्नई टेस्टमध्ये विजयासह भारताने इंग्लंडला ४-० ने क्लीन स्वीप करत सिरीज जिंकली आहे. १९३२ मध्ये पहिली टेस्ट सीरीज खेळल्यानंतर आतापर्यंत ८४ वर्षात भारतीय क्रिकेट इतिहासात ही दुसरी वेळ आहे जेव्हा भारताने टीम इंग्लंडला ४-० ने हरवलं आहे.


२०१३ मध्ये भारताने असाच विजय मिळवला होता. भारताने ऑस्ट्रेलिया विरोधातील चार टेस्ट मॅचच्या सिरीजमध्ये क्लीन स्वीप केलं होतं. भारताचा कॅप्टनकूल धोनीने ही कामगिरी करुन दाखवली होती. विराट कोहलीने धोनीच्या या विजयाची बरोबरी केली आहे.