कटक : तब्बल ३ वर्षानंतर संघात पुनरागमन करणाऱ्या युवराज सिंगने कटकच्या मैदानात शानदार १५० धावांची खेळी केल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युवराज म्हणाला, मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याच्या विचारात होतो मात्र विराट कोहलीने माझ्यावर विश्वास ठेवला. त्याच्यामुळेच मी माझा विचार बदलला.


तडाखेबंद खेळी करणाऱ्या युवराजला दुसऱ्या वनडेत मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार देण्यात आला. यावेळी तो फारच भावुक झाला. 


'मी जी लढाई लढून आलोय त्याच्याबद्दल केवळ मीच जाणतो. मला माहीत नव्हते मी पुन्हा खेळू शकेन की नाही. लोकांचाही विश्वास नव्हता. मात्र माझा स्वत:वर विश्वास होतो. मी माझ्या करिअरमध्ये अनेक चढ-उतार पाहिलेत. कधीही हार मानली नाही पाहिजे असे माझे मत आहे,' असे युवराज म्हणाला.