मुंबई : बॉलीवूड तसेच क्रिकेट वर्तुळात रंगलेल्या विराट-अनुष्काच्या साखरपुड्यांच्या चर्चांना अखेर खुद्द कसोटी कर्णधार विराटने पूर्णविराम दिलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट आणि अनुष्का यांचा नव्या वर्षात साखरपुडा होतोय. अशा चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. मात्र या सर्व चर्चांवर विराटने खुद्द प्रतिक्रिया दिलीये. 


ट्विटरवरुन त्याने साखरपुड्याबाबतच्या अफवांवर स्पष्टीकरण दिलेय. आमचा साखरपुडा होत नाहीये. तसेच आम्ही साखरपुडा करत असलो तर ते लपवणार नाही. साखरपुड्याबाबत केवळ अफवा पसरवल्या जात आहे. त्यामुळे गोंधळून जाऊ नका, असे विराटने ट्विटरवर म्हटलेय.