कानपूर : येत्या २६ जानेवारीला होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यांसाठी भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ सोमवारी कानपूरमध्ये पोहोचले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कानपूर येथील हॉटेलमध्ये उतरताच पारंपारिक पद्धतीने टिळा लावून क्रिकेटर्सचे स्वागत कऱण्यात आले. यावेळी हॉटेल मॅनेजमेंटने २० रंगांचा केक केला होता. भारताचा कर्णधार विराट कोहलीला हा केक कापायचा होता.


हॉटेल मॅनेजमेंटने विराटला केक कापण्याची रिक्वेस्ट केली. मात्र त्याने लगेच नकार देत विनंती फेटाळून लावली. भारताचे स्टार क्रिकेटर तेथे येणार म्हणून अनेक क्रिकेट चाहत्यांनी त्या हॉटेलमध्ये गर्दी केली होती.