नवी दिल्ली : भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देवन यांनी कर्णधार विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. कसोटी क्रिकेटमधील ब्रायन लाराचा 400 धावांचा विक्रम मोडण्याची क्षमता फक्त विराट कोहलीकडे आहे असं मत कपिल देव यांनी व्यक्त केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद विराटकडे आहे. नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिज विरूद्धच्या पहिल्या कसोटीत त्याने व्दिशतक झळकावले होते. याआधी एकाही भारतीय कर्णधाराने परदेशात अशी कामगिरी केलेली नाही. कामगिरीतील सातत्यामुळे विराट सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे. प्रत्येक सामन्यात तो स्वतःला सिद्ध करत असतो. विराटची हीच यशस्वी वाटचाल लक्षात घेऊन कपिलनी हे वक्तव्य केलं आहे.


कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने 1983 साली विश्वचषक जिंकला होता. वेस्ट इंडिजच्या ब्रायन लारा यांनी केलेला 400 धावांचा विक्रम आजतागायत एकाही फलंदाजाला मोडता आलेला नाही. पण विराट हा विक्रम मोडू शकतो असं कपिल देव यांना वाटतं.