मुंबई: महाराष्ट्रातल्या दुष्काळामुळे आयपीएलचे सामने राज्याबाहेर खेळवण्याचे आदेश कोर्टानं दिले. यानंतर आता मुंबई आणि पुण्याच्या टीमच्या राज्यात होणाऱ्या मॅच या विशाखापट्टणमच्या स्टेडियममध्ये होणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जयपूरमध्ये मुंबईच्या मॅच घेण्यात याव्यात यासाठी मुंबई इंडियन्सची टीम आग्रही होती, पण अखेर विशाखापट्टणममध्ये या मॅच खेळवण्याचा निर्णय आयपीएल आणि बीसीसीआयनं घेतला. 


या दोन्ही टीमच्या मॅच विशाखापट्टणमच्याच स्टेडियममध्ये होणार असल्यानं आयपीएलच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आले आहेत. 15 मे ला किंग्स इलेव्हन विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यामध्ये होणारा सामना चार वाजता तर मुंबई विरुद्ध दिल्लीचा सामना आठ वाजता होणार आहे. 


तसंच नॉक आऊट स्टेजसाठी होणाऱ्या मॅचची ठिकाणंही बदलण्यात आली आहेत. बैंगलोरच्या स्टेडियममध्ये पहिली क्वालिफायर आणि फायनल होईल, तर दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानात एलिमिनेटर आणि दुसरी क्वालिफायर मॅच होईल.