मुंबई: झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवडण्यात आलेल्या या टीममध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. पण युवराज सिंग आणि हरभजन सिंग या दोघांनाही या टीममध्ये स्थान देण्यात आलं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टी 20 वर्ल्ड कपमध्ये जखमी होण्यापर्यंत सगळ्या मॅच युवराज खेळला होता, पण हरभजन सिंग मात्र टीमबरोबर असला तरी त्याला संधी मिळाली नव्हती. या दोघांना आता डावलल्याबद्दल संदीप पाटील यांना विचारण्यात आलं. 


आम्ही भारतीय क्रिकेटच्या भविष्याचा विचार करून टीमची निवड केली आहे. कोणत्या खेळाडूनं कधी निवृत्त व्हायचं हे आम्ही सांगू शकत नाही. त्यांनी चांगली कामगिरी करून पुन्हा टीममध्ये पुनरागमन केलं तर चांगली गोष्ट आहे, असं रोखठोक मत संदीप पाटील यांनी व्यक्त केलं आहे.