मुंबई : भारत-वेस्टइंडिज यांच्यात होणार सेमीफायनलचा सामना काही तांसावर येऊन पोहोचला आहे. पण त्याआधी वेस्टइंडिजचा कर्णधार डेरेन सॅमी याने ससा आणि कासवाची गोष्ट सांगितली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सॅमी म्हणतो की, 'भारताची बाजू जड आहे. ८० टक्के मॅच ही भारताच्या बाजूने आहे. पण आम्ही कोणत्याही दबावामध्ये नाही. हा एकतर्फी सामना आहे पण लोकं हे विसरुन की कासव आणि ससा यांच्या गोष्टीत कासवच जिंकतो. आमचा जोर स्ट्राईक रोटेड करण्यावर आहे.'


सॅमी म्हणतो की, 'कोहलीचा फार्म हा निर्णायक आहे. पण आमच्याकडे देखील क्रिस गेल आहे. हा कठीण सामना आहे. पण आमचं लक्ष्य हे चांगलं प्रदर्शन करण्याचा राहणार आहे.'