मोहाली : रविवारी झालेल्या टी-२० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर शानदार विजय मिळवला आणि सेमीफायनलमध्ये जागा मिळवली. या विजयाचा हिरो ठरला तो विराट कोहली. त्याच्या नाबाद ८२ धावांच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचे आव्हान पूर्ण केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी सामना संपल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेदरम्यान कोहली थोडा भावुकही झाला. त्याने युवराज तसेच धोनीचे आभार मानले त्याचबरोबर भारतीय चाहत्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल तो भरभरुन बोलला. क्रिकेट चाहत्यांच्या या पाठिंब्यामुळेच सामन्यात जिंकण्याची उर्मी मिळते.


तसेच युवराने मला चांगली साथ दिली. जेव्हा टीमला गरज होती तेव्हा युवी धावून आला. त्यानंतर आलेल्या धोनीने मला आक्रमक होण्यापासून रोखलं. मला शांत राहायला सांगितलं ज्यामुळे मी माझ्या कारकिर्दीतील आणखी एक चांगली खेळी साकारु शकलो.