बंगळुरू : पुणे टेस्टमधील पराभव टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. पुण्यात जसा खेळ झाला तितका वाईट खेळ आमच्याकडून होणार नाही अशी ग्वाही विराट कोहलीने दिलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंगळुरुमध्ये शनिवारपासून सुरु होणा-या टेस्टआधी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियन टीमनं कसून सराव केलाय. यानंतर कोहलीनं माध्यमांशी संवाद साधला.


पुणे टेस्टमधील पराभव मनाला लागला असून प्रत्येक पराभव काही ना काही शिकवत असतो. पुन्हा जोमानं कमबॅक करु आणि सीरीज खिशात घालू असा विश्वास कोहलीनं व्यक्त केलाय. बंगळुरुच्या पीचवर पुन्हा एकदा नजरा असतील, मात्र इंग्लंडविरुद्धच्या सीरीजप्रमाणेच ही पीच असेल असा अंदाज ऑस्ट्रेलियन कॅप्टन स्टीव स्मिथनं वर्तवलाय.