लॉडेरहिल : कसोटीमध्ये टीम इंडियाने वेस्ट इंडिजला धूळ चारली असली तर टी-20 चे राजे आम्हीच हे वेस्ट इंडिजच्या टीमने शनिवारच्या सामन्यात दाखवून दिले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात वेस्ट इंडिजने टीम इंडियावर एका धावेने विजय मिळवला. शेवटच्या चेंडूत भारताला विजयासाठी 2 धावांची गरज होती आणि स्ट्राईक होता कर्णधार महेंद्रसिंग धोनीकडे.


फिनिशर अशी ओळख असलेला धोनी शेवटच्या चेंडूत 2 धावा सहज काढेल असे वाटले होते. मात्र ब्राव्होने त्याल झेल देण्यास भाग पाडले आणि भारताला विजयाने हुलकावणी दिली. दोन टी-20 सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिजने 1-0 अशी आघाडी घेतलीये.


आज या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा टी-20 सामना रंगणार आहे. या सामन्यात विजय मिळवत टीम इंडिया पराभवाचा वचपा काढण्यास सज्ज झालीये. दुसरीकडे सलग दुसरा टी-20 सामना जिंकत मालिका खिशात घालण्याचा मानस वेस्ट इंडिजचा असेल.


सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वाजता