बंगळुरु : यजुवेंद्र चहल टी ट्वेंटीमध्ये पाचपेक्षा अधिक विकेट घेणारा भारतीय बॉलर ठरला आहे.  यजुवेंद्र चहलने ४ षटकात २५ धावा देऊन ६ विकेट्स घेणारा विजयाचा हिरो ठरला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्णधार विराट कोहलीच्या टीम इंडियाने बंगळुरुच्या तिसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टीत इंग्लंडचा ७५ धावांनी धुव्वा उडवून ३ सामन्यांची टी ट्वेंटी मालिका २-१ ने खिशात घातली आहे.


श्रीलंकेच्या अंजता मेंडिसच्या नावावर यापूर्वी टी ट्वेंटीमध्ये पाचपेक्षा अधिक विकेट घेण्याचा मान  होता.टी ट्वेंटीमध्ये पाच पेक्षा अधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चहल आता दुसऱ्या स्थानावर आला आहे. कारण दोन वेळा मेंडिसने आतापर्यंत २ वेळा ६विकेट घेतल्या आहेत.


 अद्याप भारतीय गोलंदाजांच्या नावावर हा विक्रम नव्हता. मात्र मेंडिसने १८  सप्टेंबर २०१२ रोजी झिम्बाम्ब्वेविरुद्ध खेळताना ४ ओव्हरमध्ये ८ धावा देत ८ विकेट घेतल्या होत्या. त्याने टी ट्वेंटीमध्ये आतापर्यंत दोन वेळा ६ विकेट घेतल्या आहेत.