मुंबई : भारताने वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात जबरदस्त विजय मिळवला. विराटने भारताला पुन्हा एकदा विराट विजय मिळवून दिला. पण जर या मोठ्या मॅचमध्ये भारताचा पराभव झाला असता तर... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचा पराभव झाला असता तर व्हिलन पुन्हा एकदा युवराज ठरला असता. युवराज मैदानावर आला तेव्हा काही बॉल्स खेळल्यानंतर त्याच्या पायाला दुखापत झाली आणि भारतीय टीम पुन्हा डगनगायला लागली कारण रन्स येणं कमी झालं.


युवराज सिंगने विराटला साथ दिली पण यशस्वी खेळी करू शकला नाही. मागच्या एका वर्ल्डकपमध्ये देखील युवराज सिंगवर पराभवाचं खापर फोडण्यात आलं होतं त्यामुळे आजच्या मॅचमध्ये त्याच्यावर खापर फुटलं असतं हे निश्चित.