मुंबई : लग्नाचे बंधन हे खूप खास असते. मग ती मुलगी असो वा मुलगा. दोघांसाठी लग्न म्हणजे एक जीवनाची नवी सुरुवात असते. त्यामुळे आपल्या होणाऱ्या जीवनसाथीबद्दल माहिती असणे गरजेचे असते. लव्हमॅरेजमध्ये आपल्याला त्या मुली अथवा मुलाबद्दल माहिती असते मात्र अरेंज मॅरेजमध्ये समोरच्या मुला-मुलीला जाणून घेण्याची संधी मिळत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अरेंज मॅरेजमध्ये अनेकदा मुलींना होणाऱ्या नवऱ्याला काही प्रश्न विचारायचे असतात मात्र ती हे प्रश्न विचारु शकत नाही. 


हे आहेत ९ प्रश्न


१. तुझी कोणी गर्लफ्रेंड होती का? तुमच्या दोघांमध्ये काही झालं होत का?


२. वन नाइट स्टँडबद्दल तुझं मत काय?


३. माझे कपडे तुला पसंद नाही का? लग्नानंतर मी छोटे कपडे घातलेले तुला आवडणार नाहीत का?


४. लग्नानंतर तुही कधीतरी जेवण बनवशील का? का मीच जेवण बनवावं अशी तुझी इच्छा आहे?


५. मला लग्नानंतर काम करायचे आहे? लग्नानंतर नोकरी सोडण्यास तु फोर्स करणार नाहीस ना?


६. तु इतका चांगला आहे तर आतापर्यंत सिंगल कसा?


७. तुझा देवावर विश्वास आहे का?


८. तुझे तुझ्या एक्स-गर्लफ्रेंडवर आताही प्रेम आहे का?


९. तु हे लग्न तुझ्या मर्जीने करतोयस की घरच्यांच्या दबावाने?