मुंबई : 11 वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत प्रचंड गोंधळ पाहायला मिळतोय. आज झालेल्या शेवटच्या चौथ्या फेरीत मोठा गोंधळ झालाय. अनेक मुलांचं नाव कोणत्याही लिस्टमध्ये नाही. तसंच अनेकांना घरापासून लांबची कॉलेजेस मिळाली आहेत. 


कमी मार्क मिळालेल्यांना चांगली कॉलेज आणि जास्त मार्क असलेल्यांना कमी दर्जाची कॉ़लेजेस मिळाल्याचे प्रकार यंदाही घडले आहेत. त्यामुळे पालकांमध्ये प्रचंड संताप आहे.