मुंबई : दहावीची परीक्षा आजपासून सुरू होतेय. दहावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातून १७ लाख २७ हजार ४९६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलीय. यापैकी 66 हजार विद्यार्थी पुन्हा परीक्षा देत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याच्या ९ विभागामध्ये ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ४ हजार ५३५ परीक्षा केंद्रावर तयारी पूर्ण झाली आहे. 


विद्यार्थ्यांचा ताण कमी व्हावा म्हणून बहुतांश विषयाच्या पेपरमध्ये खंड ठेवण्यात आले आङेत. तर बारावी प्रमाणेच दहावीलाही यावर्षीपासून प्रौढ लेखनिकाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीय.