मुंबई : समुद्र किनारी फिरणे, लाटा पाहत संध्याकाळी वेळ घालवणे, समुद्र किनाऱ्यावरचा अनुभव हा काही वेगळाच असतो. भारतात काही खूपच सुंदर समुद्र किनारे आहेत. ज्यामधल्या ५ किनाऱ्यांची माहिती तुम्हाला देत आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. कोवालम बीच, केरळ : 


त्रिवेन्द्रम पासून १६ किलोमीटरवर मलिबार किनारपट्टीला लागून कोवालम हा किनारा आहे. एक विस्मरणीय क्षण घालवण्यासाठी या समुद्राला भेट द्या. लाईट हाउस हे या बीचचं खास आकर्षण आहे. किनाऱ्यावरील नैसर्गिक दगडी सजावट आणि शांत लाटा हे या किनाऱ्याची विशेषता आहे.


२. राधानगर बीच, अंदमान : 


टाईम मॅगॅझीनने आशिया खंडातील बेस्ट बीच म्हणून या बीचचा  गौरव केला आहे. शुभ्र पांढरी मुलायम वाळू, तळाचा ठाव घेऊ शकणारे निळसर पाणी हे खरोखरच वेड लावणारे आहे. निसर्गाचं सौंदर्य अनुभवायला येथे जावे. स्कूबा डायव्हिंग, मासेमारी, सर्फिंग इत्यादीचा पुरेपूर आनंद तुम्हाला घेता येईल.


३. तारकर्ली बीच, महाराष्ट्र :


कारली नदीचा किनारा हा अरबी समुद्राच्या साथीने जगाला सुंदरतेचा संदेश देणारा आहे. महाराष्ट्रातील मालवणमधील हा एक निर्मळ आणि सुरक्षित किनारा आहे. सूर्य प्रकाशात अगदी 20 फुटापर्यंत समुद्रतळ दिसू शकतो. शांत वेळ घालवण्यासाठी येथे निश्चित भेट द्या. 


४. मेरारी बीच, केरळ :


केरळमधील आलेप्पी गावाजवळील एक सुंदर किनारा. छोटे छोटे रिसॉर्ट्स, घरगुती फूड, लुसलुशीत वाळू, लाटा हे या किनाऱ्याची वैशिष्ट्य आहे.


५. बंगाराम बीच, लक्षद्वीप : 


चंदेरी वाळू, उबदार पाणी आणि नारळाची झाडे हे या किनाऱ्याचं वैशिष्ट्य. पावसाळ्यात हेलीकॉप्टरने बेटावर उतरण्याची सोय असलेळे हे बेट जणू एक स्वर्गच. जगातील टॉप टेन किनाऱ्याच्या यादीत असलेला हा छोटासा बंगाराम. स्वच्छ पाणी, रंगीबेरंगी मासे तुम्हाला वेगळाच आनंद देऊन जातो.