नाशिक: मी ब्रह्मचारी आहे. मी दिलेल्या शापामुळेच काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता गेली, असे वक्तव्य दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केले. ते शुक्रवारी नाशिकमधील कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी नाशिकमधील पक्षाच्या अवस्थेविषयी नाराजी व्यक्त केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या पक्षाची मजबूत बांधणी व्हावी, यासाठी कोणत्याही अधिकाऱ्याची बदली करणार नाही. एवढेच नव्हे तर कोणत्याही कार्यकर्त्याला कोंबडी, मासे आणि म्हैस फुकट मिळणार नाही. त्यासाठी लायकीचा कार्यकर्ता बना, असे त्यांनी सांगितले. 


मात्र, यावेळी त्यांनी भाषणाच्या ओघात विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत दिले. आपण ब्रह्मचारी आहोत, आपण दिलेल्या शापामुळेच काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार गेले, असे जानकरांनी म्हटले. यापूर्वी संभाजी भिडे यांनी माझ्या बागेतील आंब्यामुळे अनेक जोडप्यांना मुले झाली, असे विधान केले होते. त्यावरुन बरीच टीकाही झाली होती. त्यामुळे आता विरोधक महादेव जानकारांनाही लक्ष्य करण्याची शक्यता आहे.