नंदुरबार: शहादा तालुक्यातील नवलपूर शिवारात अज्ञात माथेफिरुने मुरलीधर गोविंद पाटील यांच्या शेतातील ७०० पपईची झाडं कापून फेकली. या घटनेमुळे संबधित शेतकऱ्यांचं सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले आहे. या भागात असे प्रकार वारंवार घडत असल्याने अशा घटनांमुळे शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटना रोखण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याने स्थानिकांच्या संतापात आणखीनच भर पडली आहे.