PHOTO : अंबानी कुटुंबानं लावून दिलं 50 मुलींचं लग्न; सामूहिक विवाह सोहळ्यानंतर आता मुलगा अनंतच्या लग्नाची तयारी सुरु

Diksha Patil Wed, 03 Jul 2024-2:29 pm,

त्यामुळेच आता चर्चा आहे ती अंबानी कुटुंबियांनी घडवून आणलेल्या एका आगळ्यावेगळ्या सामूहिक विवाह सोहळ्याची. सुरुवातीला स्वामी विवेकानंद ज्ञान मंदिर पालघर येथे आयोजित करण्यात आलेला हा सामूहिक विवाह सोहळानंतर रिलायन्स कॉर्पोरेट पार्क ठाणे येथे स्थानांतरीत करण्यात आला.

आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या दांपत्याची जबाबदारी घेऊन, त्यांचं थाटामाटात लग्न समारंभ अंबानी कुटुंबियांकडून करण्यात आला. अतिशय आलिशान मंडप भोजन व्यवस्था हे बघून नवविवाहित दांपत्य आणि त्यांचे कुटुंबीय भारावून गेले.

या सामूहिक लग्न समारंभामुळे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्न सोहळ्याची सुरुवात झाली आहे.  

या सामूहिक विवाह सोहळ्यासाठी 50 आर्थिक दुर्बल दांपत्यांना पालघरवरून या विशेष सोहळ्यासाठी स्थानांतरित करून, ठाणे येथे अविस्मरणीय सोहळा पार पडला. साधारणतः 800 लोकांमध्ये पार पडला या सोहळ्यात त्यांचे कुटुंबीय, समाजातील प्रतिष्ठित लोक, समाजसेवक इत्यादी उपस्थित होते.

अंबानी कुटुंब नेहमीच 'मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे'. या एका विचारावरती काम करत असते आणि हीच त्यांच्या कुटुंबाची परंपरा आहे. या सामूहिक विवाह सोहळ्यात नीता अंबानी आणि मुकेश अंबानी सुद्धा उपस्थित होते.

या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये प्रत्येक दाम्पत्यांला सोन्याची आभूषण आहे. त्यात मंगळसूत्र अंगठी आणि नथ ही भेट म्हणून देण्यात आली.

अंबानी कुटुंबियांचं या सामूहिक विवाह सोहळ्याच्या नियोजनानंतर सर्व स्तरातून प्रचंड कौतुक होत आहे. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link