Mahaparinirvan Din 2023:असा झाला होता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा दुसरा विवाह!
वंचितांच्या हक्कासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिवसरात्र लढले होते.
बाबासाहेब आंबेडकरांच्या या लढ्यात त्यांच्या पहिल्या पत्नी माता रमाबाई यांचा सिंहाचा वाटा होता. काही काळानंतर रमाबाई यांचं क्षयरोगाने निधन झालं होतं.
रमाबाईंच्या जाण्याने बाबासाहेब एकाकी पडले होते, दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत जात होती . बाबासाहेबांच्या जवळच्यांनी दुसऱ्या लग्नाचा आग्रह केल्यानं आंबेडकरांनी दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतला होता.
बाबासाहेबांनी एका ब्राम्हण कुटुंबातील, पेशाने डॉक्टर असलेल्या 'शारदा कबीर ' यांच्याशी विवाह केला होता.
15 एप्रिल 1948 रोजी दिल्लीत 15-20 निमंत्रितांच्या उपस्थितीत नोंदणी पद्धतीने डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. शारदा कबीर यांचं लग्न झालं होतं.
लग्नानंतर 'शारदा कबीर' या 'सविता आंबेडकर' झाल्या. बाबासाहेबांचे अनुयायी त्यांना माई म्हणून हाक मारत होते.
बाबासाहेबांनी आयुष्यभर ज्या ब्राम्हण समाजविरोधात लढा केला त्याच समाजाची त्यांनी दुसरी पत्नी केली म्हणून अनेकांनी टीका केली होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीत निधन झालं. यानंतर बाबासाहेबांच्या मृत्यूबद्दल काहींनी संशय व्यक्त केला होता.
बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर माईंवर बाबासाहेबांची हत्या केल्याचा आरोप केला होता. न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर त्यांच्यावरील आरोप मागे घेण्यात आले.