Chanakya Niti For Wealth: तुम्ही आपल्या जीवनात चाणक्य नीतिचा अबलंब केला तर यशस्वी व्हाल शिवाय तुम्ही गरिबीतून श्रीमंत व्हाल. चाणक्याने आपल्या धोरणांमध्ये मानवी जीवनाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांच्या धोरणांवर आधारित शास्त्राला चाणक्य नीति म्हणतात. चाणक्य नीति पूर्वीप्रमाणेच यशस्वी होती, ती आताही तितकीच प्रभावी ठरत आहेत. चाणक्य नीतिच्या धोरणांचा अवलंब करून अनेकांनी यश संपादन केले आहे. आजही आम्ही चाणक्याच्या अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करुन गरिबातील गरीब श्रीमंत होऊ शकतो.


ज्ञान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चाणक्य आपल्या धोरणांमध्ये म्हणतात की माणसाचा सर्वात मोठा शत्रू त्याचे अज्ञान आहे. अशा वेळी सर्वप्रथम हे अज्ञान दूर करुन जीवनात ज्ञानाचा दिवा लावला पाहिजे. प्रत्येक दु:ख आणि वेदना दूर करण्यासाठी ज्ञान उपयुक्त आहे. यामुळे यशाचा नवा मार्ग मिळतो. (अधिक वाचा - जगाचा विनाश केवळ 9 वर्षे दूर ! हे बाबा वेंगा यांचे भाकीत नसून शास्त्रज्ञांचा दावा)


दान


चाणक्य धोरणानुसार तुमचे उत्पन्न कितीही असले तरी त्यातील काही भाग दान आणि परोपकारासाठी वापरला पाहिजे. असे केल्याने गरिबी नष्ट होते आणि माणूस यशाची शिडी चढू लागतो.


धर्मग्रंथ


आचार्य चाणक्य यांच्या मते, पौराणिक काळापासून अनेक धार्मिक ग्रंथ मानवाकडे आहेत. यामध्ये मानवी जीवनातील दुःख दूर करण्यासाठी ज्ञानातून अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. अशा स्थितीत धार्मिक ग्रंथ वाचलेच पाहिजेत. यामध्ये दिलेले विचार शुध्दीकरण करतात, तसेच जीवनातील सततच्या दु:खांचा अंत होण्यासही पुष्कळ प्रमाणात उपयुक्त ठरतात.


प्रामाणिकपणा


चाणक्य नीतिनुसार, वेळ किंवा परिस्थिती कोणतीही असो, व्यक्तीने नेहमी प्रामाणिकपणाचा मार्ग अवलंबला पाहिजे. जे आपले काम प्रामाणिकपणे करतात आणि कोणाची फसवणूक करत नाहीत, त्यांच्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि सदैव तिची कृपा राहते.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)