Chanakya On Relationship : आचार्य चाणक्य हे एक महान अर्थशास्त्रज्ञ, नीतिशास्त्र आणि मुत्सद्दी होते.  आचार्य चाणक्यांनी चाणक्य नीतीमध्ये जीवनात यशस्वी होण्यासाठी मंत्र सांगितले आहेत. आचार्य चाणक्यांनी (Acharya Chanakya) आपल्या चाणक्य नीतिमध्ये (Chanakya Niti) पती-पत्नीच्या नात्याविषयी मार्गदर्शन केलं आहे. स्त्रियांचा स्वभाव (nature) कसा असतो, यश कसे मिळू शकते. सुखी जीवन (happy life) कशाप्रकारे मिळू शकते याविषयी चाणक्यांनी आपल्या नीतिमध्ये सांगितले आहे. याच नीतिमध्ये चाणक्यांनी प्रेमसंबंधाविषयी आपलं तत्वज्ञान सांगितलं आहे. प्रेम संबंध कसे टिकवले जातात, कोणत्या पुरुषांच्या प्रेम संबंधात स्त्रिया खूश राहतात याची माहिती आपण या लेखातून घेऊ. ( Chanakya Niti marriage life of these men lasts long )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चाणक्य नीतीनुसार जिथे विश्वास असतो तिथे कोणतेही बंधन नसते. ज्या पुरुषांनी आपल्या लाइफ पार्टनरला स्वतःच्या इच्छेने आयुष्य जगू दिले त्या पुरुषांचे प्रेमाचे नाते दीर्घकाळ टिकते. स्त्रियांना अधिक प्रतिबंधात्मक असलेल्या पुरुषांशी संबंधांमध्ये गुदमरल्यासारखे वाटते. चाणक्य नीतीनुसार कोणत्याही नात्यामध्ये आदर खूप महत्त्वाचा असतो. चांगल्या नात्याचा पाया हा आदर आणि प्रेम असतो. जे पुरुष महिलांचा आदर करतात त्यांच्याशी महिलांचे प्रेमसंबंध दीर्घकाळ टिकतात. जे पुरुष महिलांचा अनादर करतात  त्यांचे प्रेमसंबंध फार काळ टिकत नाहीत.


वाचा : 5G तुमच्या मोबाईलमध्ये चालणार का? असं करा चेक


आचार्य चाणक्यांच्या चाणक्य नीतीनुसार महिला पुरुषांसोबत राहणे पसंत करतात. त्यांना सुरक्षित वाटते. जे पुरुष स्त्रियांचे रक्षण करू शकत नाहीत त्यांचे प्रेमप्रकरण फार काळ टिकत नाही. जर एखाद्या पुरुषाने स्त्रीसाठी भूमिका घेतली तर त्याला ते खूप आवडते. चाणक्य नीतीनुसार जे पुरुष अहंकारी नसतात त्यांचे जोडीदारासोबतचे प्रेमसंबंध दीर्घकाळ टिकतात. नात्यात गोडवा ठेवायचा असेल तर त्याला अहंकार नसावा. अहंकारी पुरुषांना स्त्रिया आवडत नाहीत. पुरुषाला आपले नाते दीर्घकाळ टिकावे असे वाटत असेल तर त्याने अहंकारापासून दूर राहिले पाहिजे.