मुंबई : 16 मे 2022 रोजी चंद्र ग्रहण आहे. याचा ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीकोनातून खूप फरक पडतो. तीन राशींवर त्याचा परिणाम होणार आहे. या ग्रहणाचा तीन राशींवर मोठा परिणाम होणार हे जाणून घेऊया.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृभष : चंद्र ग्रहणामुळे आपल्या आयुष्यात काही बदल घडू शकतात. करिअर, व्यावसाय क्षेत्रामध्ये बाधा निर्माण होऊ शकतात. अडथळे येतील त्याला धौर्याने सामोरं जाण्याची तयारी ठेवा. 


मनासरखी गोष्ट मिळणार नाही. आर्थिकदृष्ट्याही आपलं समाधान होणार नाही. आरोग्याची काळजी घ्यायला हवी. तुम्हाला जर कोणता आजार असेल तर काळजी घ्या. 


कन्या : जवळच्या संबंधांमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. नात्यांमध्ये दुरावा येऊ नये यासाठी काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा. नकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. वैवाहिक आयुष्यात अडचणी येतील. 


मानसिक तणाव असणार आहे. आत्मविश्वासाची कमतरता जाणवेल. आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. धीर आणि संयम ठेवा. 


वृश्चिक : आपल्याला खूप जास्त सावध राहावं लागणार आहे. स्वर्थासाठी काही गोष्टी करू नका. कोणताही निर्णय घेण्याआधी विचार करा. पार्टनरचा सल्ला महत्त्वाचा ठरणार आहे.