Chanakya Niti Life Lessons: जीवनात उद्देश असणे आवश्यक आहे, अन्यथा व्यक्ती दिशाहीन होते. यशस्वी आणि आनंदी जीवनासाठी चांगल्या सवयी आणि चांगले कर्म आवश्यक आहेत. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात याबाबत सांगितलं आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात चांगले कर्म केले पाहिजे, अन्यथा त्या व्यक्तीचे जीवन व्यर्थ ठरते. आचार्य चाणक्य याच्या नीतिनुसार व्यक्तीने संवेदनशील, मेहनती, विचारी आणि प्रामाणिक असणे आवश्यक आहे. चांगल्या आयुष्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे ते जाणून घ्या.


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    ज्या लोकांना दया येत नाही, त्यांचे जीवन व्यर्थ आहे. इतकेच नाही तर त्यांच्या स्वभावाचा कठोरपणा त्यांना माणूस म्हणून जगू देत नाही आणि त्यांचे जीवनात मोठे नुकसान होते.

  • जे लोक नेहमी दुसऱ्यांशी भांडतात. अशा लोकांपासून लोक अंतर ठेवतात. अशा लोकांना समाजात कधीच मान मिळत नाही. त्यांच्यातला हा गुण त्यांना यश मिळवू देते आणि आनंदही देत ​​नाही. 

  • जे लोक स्वतःचे कर्म करून पैसा कमावण्याऐवजी इतरांच्या संपत्तीवर डोळा ठेवतात, त्यांना आयुष्यात कधीही सुख मिळत नाही. उलट चोरी, लबाडी आणि फसवणूक करून कमावलेला पैसा त्यांचा आणि कुटुंबाचा नाश करतो.

  • जे लोक मित्रपरिवाराला अडचणीच्या वेळी मदत करत नाहीत, लोक त्यांना साथही देत ​​नाहीत. अडचणीच्या वेळी या लोकांना कोणीही मदत करत नाही. असे लोक आयुष्यात एकटेच लढत राहतात.

  • रागीट लोकांच्या आयुष्यात शेवटी पश्चाताप करण्याची वेळ येते. रागामुळे स्वतःच्या घरातील लोकांनाही त्याच्यासोबत राहणे आवडत नाही. रागामुळे ते त्यांच्या आयुष्यातील अनेक चांगल्या संधी गमावतात आणि त्यांची ऊर्जा नकारात्मक कामात वाया घालवतात.

  • दान- धर्म, परोपकार न करणार्‍या व्यक्तीचे जीवन सुद्धा ओझ्यासारखे असतात. कारण त्यांच्या कर्मात कोणतंच पुण्य पडत नाही आणि दुसऱ्यांच्या कामी येत नाहीत.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)