Tuesday Upay : मंगळवारी एक छोपा उपाय केला तर तुमच्या कामात येणार अडथळा दूर होईल. तसेच बजरंगबलीची तुमच्यावर कृपा राहिल. मंगळवार हा हनुमानजींना समर्पित आहे. असे म्हणतात की या दिवशी बजरंगबली मनापासून विचारलेली प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. अशा स्थितीत या दिवशी काही ज्योतिषीय उपायही सांगण्यात आले आहेत. जाणून घ्या मंगळवारचे हे उपाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Tuesday Remedies, Vrat Niyam : ज्योतिष शास्त्रानुसार मंगळवार हा दिवस हनुमानजींना समर्पित आहे. आठवड्यातील सातही दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतात. तसाच मंगळवार आहे. मंगळवारी हनुमानजीची पूजा केली जाते.  या दिवशी बजरंगबलीची पूजा-अर्चा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हणतात. त्याचबरोबर जीवनात येणाऱ्या संकटांपासून सुटका मिळते. संकटातून तुम्हाला मुक्ती हवी असेल तर हनुमानजींच्या पूजेचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. मंगळवारी या उपायांचा अवलंब केल्यास जीवनातील सर्व अडथळे दूर होऊ शकतात.


मंगळवारी 'हा' सोपा उपाय करा


- तुमच्या हातात पैसा टीकत नसेल तर काही उपाय करणे गरजेचे आहे. जर आर्थिक समस्या सोडवायची असेल तर एक जप केला पाहिजे. काही दिवसात तुम्हाला आर्थिक समस्येतून सोडवून घ्यायचे असेल तर मंगळवारी हनुमान जीच्या मंत्राचा 21 वेळा जप करा. 


दुसरीकडे, जर तुम्हाला एखादे काम करताना कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल आणि काही ना काही अडथळे येत असतील तर मंगळवारी एक मौली घेऊन हनुमानजीच्या मंदिरात जा आणि कानात ठेवा. यानंतर हनुमानजींच्या चरणांवरुन सिंदूर घेऊन कपाळावर टिळक लावा. नंतर तिथे ठेवलेल्या मौलीमधून एक लांब धागा काढून हाताच्या मनगटात बांधून उरलेली मौली तिथेच ठेवावी. 


कुटुंबात सुख-समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी, वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी मंगळवारी एक लहान मातीचे भांडे आणावे. यानंतर या भांड्यात मध अडकवून ते झाकून हनुमानजीच्या मंदिरात ठेवा. 


तुमच्या कामाचा वेग कायम ठेवण्यासाठी किंवा एखाद्या कामात यश मिळवण्यासाठी मंगळवारी पांढरा कागदावर कुंकू सिंदूर घ्या. आता त्यात थोडे चमेलीचे तेल टाका, एका पांढऱ्या कोऱ्या कागदावर भगवान श्रीरामाचे नाव लिहा. त्यावर 11 वेळा भगवान श्रीरामाचे नाव लिहावे लागेल. आता हे पान सुकल्यावर घडी करुन तुमच्या पाकिटात ठेवा. 


आपल्या जोडदारासोबतचे नाते गोड करण्यासाठी मंगळवारी दगडावर पांढरे चंदन घासून त्यात थोडे केशर मिसळून पेस्ट बनवा.  भगवान विष्णूच्या मंदिरात जा आणि त्यांना टिळक लावा. यानंतर उरलेली पेस्ट तुमच्या जोडीदाराच्या आणि स्वतःच्या कपाळावर लावा.  


कुटुंबात सुख-समृद्धी टिकवण्यासाठी मंगळवारी आंघोळीनंतर चमेलीचे फूल हनुमानाला अर्पण करावे.  हनुमानजींच्या मंदिरात जाऊन हार अर्पण करा. यासोबतच कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करताना अगरबत्तीही लावावी. 


मुलांना सुख मिळवण्यासाठी मंगळवारी आंघोळीनंतर एक नारळ आणि  लाल कपडा घ्या. यानंतर नारळावर लाल कपडा गुंडाळा. त्यानंतर हा नारळ हनुमानाच्या मंदिरात अर्पण करा. यानंतर घरामध्ये योग्य ठिकाणी बसून हनुमानाष्टक पठण करावे. याचा चांगला लाभ मिळतो.  


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)