मुंबई : हिंदू धर्मात देवाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. तसेच आरतीशिवाय कोणतीही पूजा पूर्ण मानली जात नाही. जवळपास प्रत्येक घरात सकाळ संध्याकाळ देवाची आरती केली जाते. अशा वेळी आरती झाल्यावर लोक आरती घेतात. म्हणजेच दिव्यावरुन हाथ फिरवून तो हात डोळ्यांना लावतात किंवा डोक्यावरुन फिरवतात. परंतु असे का केले जाते तुम्हाला माहितीय? तर आज आम्ही तुम्हाला याबद्दल काही माहिती सांगणार आहोत. चला जाणून घेऊ या आरतीशी संबंधित काही महत्वाच्या गोष्टी.


आरती करण्याची योग्य पद्धत कोणती?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वात पहिलं तर आपण हे जाणून घेऊया की आरती करण्याची योग्य पद्धत कोणती. खरंतर भगवंताची आरती करताना, दिवा फिरवण्याच्या संख्येची आणि पद्धतीची विशेष काळजी घेतली जाते.


आरतीची सुरुवात नेहमी देवाच्या चरणांनी करावी, हे सर्वसामान्यांना माहीत नसते. चार वेळा आरती सरळ दिशेने फिरवावी आणि त्यानंतर २ वेळा देवाच्या नाभीची आरती करावी. यानंतर देवाच्या मुखाची आरती ७ वेळा करावी.


भगवंताची आरती झाल्यानंतर भाविक दोन्ही हातांनी आरती घेतात. या दरम्यान 2 भाव आहेत, पहिलं म्हणजे, ज्या दिव्याच्या ज्योतीने आम्हाला आमच्या आराध्यची नख-शिखरांचे इतके सुंदर दर्शन दिले आहे, ते आम्ही  त्याला आमच्या डोक्यावर ठेवतो आणि दुसरा भाव म्हणजे, देवासाठी ज्या दिव्याची वातीने देवाची सेवा केली आहे किंवा देवाला खुश केले आहे तिला आम्ही आमच्या डोक्यावर ठेऊ इच्छीत आहे.


आरती घेण्याचा योग्य मार्ग म्हणजे प्रथम डोक्यावर हार फिरवून मग त्या आरतीची ज्योत कपाळावर धरावी किंवा ती आरती डोक्याला लावावी.


आरती करताना या गोष्टी लक्षात ठेवा


आरती करताना तुम्ही जे काही बोलत आहात, त्याचा उच्चार बरोबर असावा, असा प्रयत्न केला पाहिजे, असे धर्मतज्ज्ञ सांगतात. तसेच आरतीच्या वेळी इतर कोणत्याही विषयाचा विचार करू नये. विशेषत: मोबाईलवरून लक्ष हटवा आणि देवाची आरती फक्त 5 मिनिटे पण एकाग्रतेने करा.


(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)