Raksha Bandhan 2024 : श्रावणातील पौर्णिमा हा बहीण भावाचा प्रेम आणि नात्यातील मधुरता दर्शविणारा सण आहे. यादिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुरक्षितेसाठी रक्षासूत्र म्हणजे राखी बांधते. यानिमित्त भाऊ बहिणीला आयुष्यभर संरक्षणाचे वचन देतो. हिंदू धर्मात रक्षाबंधन आणि दिवाळीतील भाऊबीज हे दोन सण बहीण भावाच्या पवित्र नात्याचे प्रतिक आहे. या दोन सणाबद्दल धर्मशास्त्रात एक नियम आहे. धर्मशास्त्रात असं सांगितलं गेलंय की, रक्षाबंधनाला बहिणीने भावाच्या घरी तर भाऊबीजेला भावाने बहिणीच्या घरी जाऊन औक्षण करायचं असतं. पण तुम्ही कधी विचार केला का? यामागे नेमकं कारण काय आहे ते...(Why brothers should not go to their sisters houses on Raksha Bandhan )


रक्षाबंधनाच्या दिवशी भावांनी बहिणींच्या घरी का जाऊ नये?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रक्षाबंधनाच्या सणाशी संबंधित अनेक पौराणिक कथा आहेत, ज्यामध्ये राखी बांधण्याची परंपरा सांगण्यात आलीय. यातील एक गोष्ट आहे माता लक्ष्मी आणि राजा बालीची. राजा बली हा राक्षस राजा होता. भगवान विष्णूला प्रसन्न करून त्यांनी अमरत्वाचे वरदान प्राप्त केलं होतं. त्यामुळे सर्व देवी-देवता चिंताग्रस्त झाले होते.  


हेसुद्धा वाचा - Raksha Bandhan 2024 : पत्नी नवऱ्याचा मनगटावर राखी बांधू शकते का? नियम जाणून घ्या


तिन्ही लोकाची चिंता दूर करण्यासाठी भगवान विष्णूंनी वामन अवतार धारण केलं. त्यानंतर ते राजा बळीकडे भिक्षेच्या रूपात गेले आणि त्याला तीन पावले जमीन भिक्षा देण्यास सांगितलं. बालीने वामनची विनंती मान्य केली. त्यानंतर वामनने आपल्या पहिल्या चरणात स्वर्ग आणि दुसऱ्या पायरीत पृथ्वी मोजली, त्यानंतर बालीला समजले की ते भगवान विष्णू आहेत आणि त्यांनी तिसऱ्या चरणासाठी आपले शरीर समर्पित केलं. बलीच्या कृतीवर भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी बालीला पाताळचा राजा घोषित केलं. एवढंच नाही तर, बालीच्या सांगण्यावरून ते स्वतः पाताळात राहू लागला. 


हेसुद्धा वाचा - Raksha Bandhan 2024 : रक्षाबंधनाला 'या' वेळेत चुकूनही राखी बाधू नका! जाणून शुभ मुहूर्त


यामुळे माता लक्ष्मी नाराज झाली, कारण भगवान विष्णू वैकुंठ सोडून पाताळात राहिली गेले होते. अशा स्थितीत माता लक्ष्मीने ब्राह्मण स्त्रीच्या रूपात पाताळात जाऊन राजा बळीला आपला भाऊ बनवण्याची इच्छा व्यक्त केली. राजा बालीने त्यांची इच्छा आनंदाने मान्य केली आणि माता लक्ष्मीने बालीच्या मनगटावर राखी बांधली. राखी बांधल्यानंतर देवी लक्ष्मीने बालीला तिचा पती भगवान विष्णू परत करण्यास सांगितलं. राजा बालीने आपलं वचन पाळत भगवान विष्णूंना वैकुंठाला परतण्याची परवानगी दिली. त्या बदल्यात बालीला अमरत्व आणि वैकुंठ लोकामध्ये स्थान प्राप्त झाले. 


...म्हणून भाऊबीजेला भावाने बहिणीकडे जावं!


त्यामुळे भावांनी बहिणीच्या घरी जाऊ नये, तर बहिणींनी भावाच्या घरी येऊन त्यांना राखी बांधावी, असं मानलं जातं. कारण आई लक्ष्मीनेही भावाच्या घरी जाऊन त्यांना राखी बांधली होती. त्याचप्रमाणे भाऊबीजच्या दिवशी भावांनी आपल्या बहिणीच्या घरी जाऊन औक्षण करून घ्यावे. कारण यमराज स्वतः बहीण यमुना यांच्याकडे औक्षण करण्यासाठी गेले होते. त्यानंतर भाऊबीजेचा हा सण साजरा करण्याची परंपरा सुरू झालीय.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)