मुंबई : आयपीएलमधून 3 संघाचं आव्हान जवळपास संपुष्टात आलंय. जवळपास 50 टक्के सामने पूर्ण झाले आहेत. सेमीफायनलचे संघ जवळपास निश्चित झाले आहेत. यंदाच्या सीजनमध्ये 3 संघाची कामगिरी इतकी खास नव्हती. त्यामुळे या संघाचा यंदाच्या आयपीएलमधला प्रवास जवळपास संपुष्टात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली : गौतम गंभीरच्या नेतृत्वात खेळणारी दिल्ली टीमने आतापर्यंत इतकी खास कामगिरी केलेली नाही. 6 पैकी 5 सामने दिल्लीने गमावले आहेत. 


बंगळुरु : मागच्या सीजन प्रमाणे यंदाच्या सीजनमध्येही बंगळुरुला काही खास कामगिरी करता आलेली नाही. बंगळुरुने आतापर्यंत 5 पैकी 3 सामने गमावले आहेत.


मुंबई : रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणारी मुंबई टीम देखील यंदा काही खास करु शकलेली नाही. 6 पैकी 5 सामने मुंबईने गमावले आहेत. मुंबई सारख्या चॅम्पियन संघाची यंदाची कामगिरी खूपच निराश करणारी ठरली आहे.