मुंबई: भारत कधी 83 चा वर्ल्ड कप जिंकू शकणार नाही असं म्हणणाऱ्यांची तोंड आपल्या कामगिरीनं टीम इंडियाने बंद केली. 1983 रोजी वर्ल्ड कप जिंकून टीम इंडियाने इतिहास घडवला. 1983 च्या वर्ल्ड कपवर आधारीत 83 सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. या सिनेमानं फक्त क्रिकेटप्रेमींची मनच जिंकली नाहीत तर जुन्या आठवणी आणि किस्सेही ताजे केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

83 सिनेमाच्या निमित्ताने त्यावेळी घडलेला एक किस्सा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. टीम इंडियाचे 1983 चे ओपनर श्रीकांत यांचं 83 वर्ल्ड कपच्या 2 महिने आधी लग्न झालं होतं. टीम इंडियाने त्यावेळी 2 सामने जिंकले होते. मात्र वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहोचू असं कोणालाच वाटलं नव्हतं. 


आपण पुढे पराभूत होणार य मानसिकतेतून श्रीकांत यांनी आपल्या पत्नीसोबत हनीमूनचा प्लॅन केला होता. श्रीकांत त्यावेळी 24 वर्षांचे होते. टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकणार नाही अशी त्यावेळी त्यांची मानसिकता होती. 


श्रीकांत यांनी सामने खेळून झाल्यावर अमेरिकेला हनीमूनसाठी जाण्याची तिकीटंही बुक केली होती. त्यावेळी वर्ल्ड कपसाठी श्रीकांत सुनील गावस्कर यांच्या सांगण्यावरून इंग्लंडला वर्ल्ड कपसाठी थांबले होते. 


श्रीकांत यांचा हनीमूनच्या प्लॅनिंगचा 'डाव' कपिल देव यांनी उधळून लावला. ज्यावेळी अमेरिकेसाठी हनीमूनची प्लाईट पकडण्याची वेळ आली, तेव्हाच टीम इंडिया लॉर्ड्सवर वर्ल्ड कपसाठी खेळत होती. 


वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियाला पुन्हा भारतात परत यावं लागलं. त्यामुळे श्रीकांत यांचा हनीमूनचा प्लॅन फसला. मात्र त्याऐवजी टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला आणि इतिहास घडवला. 


83 सिनेमातही हा किस्सा दाखवण्यात आला आहे. श्रीकांत मस्करीमध्ये त्याने केलेला हा प्लॅन देखील सांगतानाचा हा सीन दाखवण्यात आला आहे. श्रीकांत भावुक होत कॅप्टन कपिल देव यांनी दिलेला शब्द अखेर पूर्ण होत असल्याचंही सांगताना या सीनमध्ये दिसत आहे.