दिल्ली : 'सिक्रेट सुपरस्टार' या चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी सध्या आमिर खान आणि जायरा देशभर विविध ठिकाणी फिरत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान १३ ऑक्टोबर रोजी हे दोघेही भारत - ऑस्ट्रेलिया दरम्यानचा तिसरा टी- 20 सामन्यासाठी राजीव गांधी इंटरनेशल स्टेडियमला पोहचले होते. 


खेळापूर्वी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग आणि जतिन सप्रू यांच्यासोबत एक खास रॅपिड फायर राऊंड रंगला. यामध्ये जायरा आणि आमिररला खेळाशी निगडीत काही प्रश्न विचारले. मात्र भारतीय महिला संघाची कॅप्टन कोण ? हा प्रश्न विचारल्यानंतर दोघेही बराच वेळ अनुत्तरित राहिले. 


"मला उत्तर माहित आहे पण आता ते नाव ओठांवर येत नाही' असे उत्तर आमिर खानने दिले. त्यानंतर जतिन सप्रू यांनी बर्‍याच हिंट दिल्यानंतर आमिराने योग्य उत्तर दिले.  


मिताली राज ही भारतीत महिला क्रिकेट  संघाची कॅप्टन आहे. जगभरात 6000 धावांचा टप्पा पार करण्याचा विश्वविक्रम मितालीच्या नावावर आहे. 


पावसाचा व्यत्यय आल्याने भारत - ऑस्ट्रेलिया दरम्यानचा सामना रद्द करावा लागला.