मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात भारताने २४० धावांनी दमदार विजय मिळवला. या सामन्यात भारताचे तीन धुरंधर क्रिकेटर विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी आणि युवराज सिंग यांनी फलंदाजी केली नाही. त्यानंतरही भारताने ३२५ धावांची मोठी खेळी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यात धोनीने विकेटकीपिंगही केली नाही. मात्र वेगवेगळ्या ठिकाणी तो फिल्डिंग करत होता. यादरम्यान धोनीने साधा कॅच सोडला. हे पाहून विराटलाही हसू आवरले नाही.


धोनी एक असा क्रिकेटर आहे जो आपल्या जबरदस्त फिल्डिंग आणि विकेटकीपिंगसाठी प्रसिद्ध आहे. त्याच्या हातून साधा कॅच निसटणे साऱ्यांना हैराण करणारे होते.