मुंबई : ११ डिसेंबरला विराट कोहली आणि अनुष्का शर्मा इटलीमध्ये लग्नबंधनात अडकले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया आणि चाहत्यांपासून दूर गुप्तपणे विरूष्काचे लग्न झाले. आता लवकरच भारतामध्ये त्यांच्या वेल विशर्ससाठी दोन ग्रॅन्ड रिसेप्शन होणार आहेत.  


दिल्ली आणि मुंबईत ग्रॅन्ड रिसेप्शन  


फिनलॅन्डमध्ये हनिमूनसाठी गेलेले विरूष्का प्रथम दिल्ली आणि त्यानंतर मुंबईत ग्रॅन्ड रिसेप्शन पार्टीमध्ये सहभागी होणार आहे.  


21 डिसेंबरला दिल्लीत तर ख्रिस्मस रात्रीनंतर 26 डिसेंबरला मुंबईत ग्रॅन्ड रिसेप्शन होणार आहे.  



मुंबईत होणार ग्रॅन्ड सोहळा 


विरूष्का लग्नानंतर मुंबईतील वरळी भागात आलिशान घरात राहणार आहेत. त्यामुळे त्यांच्या लग्नाचे रिसेप्शनदेखील मुंबईतील लोअर परेल भागातच होणार आहे.  



सेलिब्रिटी आणि खेळाडूंची हजेरी 


विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे लग्न इटलीमध्ये अत्यंत गुप्तपणे झाले. केवळ ४४ लोकांच्या उपस्थितीमध्ये लग्नसोहळा पार पडल्याने दोघांचाही मित्र परिवार  लग्नामध्ये सहभागी झाले नव्हते. त्यामुळे आता रिसेप्शनमध्ये अनेक दिग्गजांची हजेरी लावणार असल्याची शक्यता आहे.