मुंबई : अनुष्का आणि विराटने इटलीत जाऊन गुपचूप लग्न केल्याने सर्वांनाच अचंबित केले. ४ महिने आधीच दोघांनी लग्नाचे प्लानिंग केले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी मोजकेच पाहुणे उपस्थित होते. इटलीतील टस्कनीमधील बोर्दो फिनोशोतो रिसॉर्टमध्ये हा विवाह झाला.


लग्न, हनीमून आता रिसेप्शन 


 लग्न आणि हनीमूननंतर आता विराट - अनुष्का भारतात परतलेत. दिल्लीत विराटच्या घरी या जोडप्याचं जोरदार स्वागत झालं.लग्न, हनीमून झाल्यानंतर विरुष्काचे रिसेप्शन होत आहे.  २१ डिसेंबरला दिल्लीत तर ख्रिस्मस रात्रीनंतर २६ डिसेंबरला मुंबईत ग्रॅन्ड रिसेप्शन होणार आहे.  


मोदींची भेट 


यानंतर विराट आणि अनुष्कानं बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलीय. खुद्द पंतप्रधान मोदींनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून विराट-अनुष्कासोबतचा फोटो शेअर केलाय. 


यावेळी नरेंद्र मोदी यांनी विराट - अनुष्काला एक छोटं गिफ्ट देऊन त्यांना लग्नाच्या शुभेच्छाही दिल्यात.या रिसेप्शनला त्यांनी पंतप्रधान मोदी यांनाही आमंत्रित केले आहे. 


३ मोठे सिनेमा


'फिल्लोरी' सिनेमानंतर अनुष्काचा कोणता सिनेमा आला नाही. पण २०१८ मध्ये अनुष्का मोठा धमाका करायला जात आहे. पुढच्यावर्षी अनुष्काचे ३ मोठे सिनेमा रिलीज होत आहेत.


पहिला 'परी',दुसरा 'सुई धागा' तर आनंद एल.राय यांचा सिनेमाही येत आहे.


आनंद एल.राय यांच्या सिनेमाचे नाव अजून फायनल झाले नाही.यामध्ये अनुष्का, शाहरूख आणि कॅटरीनासोबत दिसणार आहे. अनुष्काचे याआधीचे काही सिनेमा फ्लॉप झाले आहेत. 


१) परी ( ९ फेब्रुवारी २०१८)


सुपरनॅचरल थ्रीलर हा सिनेमा आधारित आहे. नुकताच या सिनेमाचे पोस्टर रिलीज झाले. हा सिनेमा अनुष्का स्वत: प्रोड्यूस आणि डायरेक्ट प्रोसित रॉय आहे. 


२) सुई धागा ( २ ऑक्टोबर २०१८)


महात्मा गांधींच्या 'मेड इन इंडिया' कॉन्सेप्टवर अनुष्का शर्माच्या या फिल्ममध्ये वरूण धवन मेन रोलमध्ये आहे. अनुष्का आणि वरूण पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. 


३) आनंद एल. रायचा सिनेमा ( २१ डिसेंबर २०१८) 


शाहरुख खान, कॅटरीना आणि अनुष्का स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाचे नाव अजून ठरले नाहीए. पण या नावावरुन सगळीकडे जोरदार चर्चा आहे.