नवी दिल्ली : टीम इंडियाचा सदस्य राहिलेला आशिष नेहराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवॄत्ती घेतलीये. नेहराने होमग्राऊंड्वर शेवटचा सामना खेळला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडला ५३ रन्सनी मात दिली. त्यामुळे हा शेवटचा सामना नेहरासाठी खास ठरला. नेहराला निरोपाचे संदेश पाठवणा-या खेळाडूंमध्ये पाकिस्तान टीमच्याही काही खेळाडूंचा समावेश आहे. ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ म्हणून लोकप्रिय असलेल्या पाकिस्तानचा माजी वेगवान गोंलंदाज शोएब अख्तरने आशिष नेहराला शुभेच्छा दिल्या. 



शोएब अख्तरने नेहरासाठी ट्विटरवर एक भावूक संदेश लिहिला आहे. शोएबने लिहिले की, इमानदार आणि सर्वात चांगल्या व्यक्तींपैकी एक वेगवान गोलंदाज नेहराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सन्यास घेतलाय. ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे की, मी तुझ्या विरोधात खेळलो’.