मुंबई : भारताविरुद्ध नुकत्याच झालेल्या वनडे सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाचा ४-१ असा दारूण पराभव झाला आहे. एवढा लाजीरवाणा पराभव आणि त्याहूनही धक्कादायक म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची मैदानावरची देहबोली यामुळे क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतातल्या या खराब कामगिरीबद्दल ऑस्ट्रेलियाचा कोच डेव्हिड सेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विराटच्या टीमला आम्ही घाबरलो आणि त्यामुळेच आमचा पराभव झाला, असं डेव्हिड सेकर म्हणाले आहेत. ही गोष्ट एवढी गंभीर नाही, लवकरच आम्ही यातून बाहेर पडू, कारण ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये कौशल्य आहे, असा विश्वास सेकर यांनी व्यक्त केला आहे.


परदेशी मैदानामधली ऑस्ट्रेलियाची गेल्या काही दिवसांमधली कामगिरी निराशाजनक आहे. २०१९चा वर्ल्ड कप हा इंग्लंडमध्ये होत आहे. त्यामुळे वर्ल्ड कपआधी ऑस्ट्रेलियाच्या टीमला रुळावर आणण्याचं आव्हान डेव्हिड सेकर यांच्यासमोर असणार आहे.