मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचा आज ३१वा वाढदिवस आहे. १ मे १९८८ साली उत्तर प्रदेशच्या अयोध्येमध्ये जन्म झालेल्या अनुष्काचं लग्न भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीशी झालं आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त अनुष्काने विराटबरोबर तलावाच्या काठावर रोमॅंटिक क्षण घालवले. कोहलीने हा व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर टाकला आहे. तलावाच्या काठावर बसून हे दोघं एकमेकांकडे बघून स्मितहास्य करताना दिसत आहेत. बॅकग्राऊंडला एक रोमॅंटिक इंग्रजी गाणंही वाजत आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट आणि अनुष्काने डिसेंबर २०१७ साली इटलीमध्ये विवाह केला. अनेक वर्षांपासून हे दोघं रिलेशनशीपमध्ये होते. २०१५ वर्ल्ड कपमध्ये भारताचा सेमी फायनलमध्ये पराभव झाला, यानंतर सोशल मीडियावर अनुष्का शर्मावर टीका करण्यात आली. यानंतर विराटने अनुष्काला सोशल मीडियावर पोस्ट करून पाठिंबा दिला आणि ट्रोलर्सना सडेतोड प्रत्युत्तर दिलं. यानंतर विराट-अनुष्काच्या रिलेशनशीपला दुजोरा मिळाला. 


डिसेंबर २०१८ मध्ये रिलीज झालेला झिरो या चित्रपटानंतर अनुष्का मोठ्या पडद्यावर दिसलेली नाही. शाहरुख खान, कतरिना कैफ आणि अनुष्काचा अभिनय असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरचा २०१८ मधला सगळ्यात फ्लॉप चित्रपट ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास ९० कोटी रुपयांची कमाई केली. 


आयपीएल २०१९मध्ये विराटच्या नेतृत्वात खेळणाऱ्या बंगळुरूच्या टीमच्या पदरी निराशा पडली. या मोसमात खेळलेल्या १३ मॅचपैकी ४ मॅचमध्ये बंगळुरूचा विजय आणि ८ मॅचमध्ये पराभव झाला. आयपीएलच्या प्ले ऑफच्या शर्यतीतून बंगळुरू बाहेर पडली आहे. पॉईंट्स टेबलमध्ये ९ पॉईंट्ससह बंगळुरू शेवटच्या म्हणजेच आठव्या क्रमांकावर आहे. 


आयपीएलच्या १२व्या मोसमात विराटने १३ मॅचमध्ये ४४८ रन केले आहेत. या मोसमामध्ये विराट कोहलीने एक शतकही लगावलं आहे. ३० मेपासून इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीम विराटच्या नेतृत्वात खेळणार आहे.