इंदूर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेतील विजयानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने युवा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याचे तोंडभरुन कौतुक केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पांड्याने या सामन्यात ७८ धावांची दमदार खेळी केली. रोहित आणि अजिंक्य यांनी विजयाचा पाया रचला होता. त्यावर पांड्याने कळस चढवला. 


या दमदार खेळीनंतरही पांड्या खुश नाहीये. कारण पांड्याला सामना संपवूनच पॅव्हेलियनमध्ये परत जायचं होत. मात्र भारताला जिंकण्यासाठी १० धावांची आवश्यकता असताना पांड्या बाद झाला. 


सामनावीराचा पुरस्कार पटकावल्यानंतर पांड्या म्हणाला, चांगल वाटतंय. पुढच्या वेळेस मी सामना संपवूनच पॅव्हेलियनमध्ये परतण्याचा प्रयत्न करेन.