मुंबई : टीम इंडिया पुढच्या महिन्यात प्रदीर्घ कालावधीनंतर दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जात आहे. कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारामुळे हा दौरा आधीच धोक्यात आला आहे. पण यादरम्यान टीम इंडियासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. खरंतर, विराट कोहलीचा एक महत्वाचा खेळाडू या मालिकेतून बाहेर पडला आहे. या मोठ्या मालिकेकडे पाहता ही बातमी खूपच वाईट आहे.


विराट सेनेला मोठा झटका 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या दक्षिण आफ्रिका मालिकेतून बाहेर झाला आहे. खराब फिटनेसमुळे हा खेळाडू बऱ्याच दिवसांपासून अडचणीत आहे. टी-20 विश्वचषकातही हार्दिकच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.


न्यूझीलंड मालिकेत त्याला विश्रांती देण्यात आली होती. आता दक्षिण आफ्रिका मालिकेपूर्वी या अष्टपैलू खेळाडूने काही काळ खेळापासून दूर राहायचे असल्याचे सांगितले आहे.


पुन्हा फॉर्ममध्ये येण्यासाठी मागितली वेळ 


हार्दिकला फिटनेसमुळे गोलंदाजीही करता येत नव्हती आणि त्यामुळे त्याला फक्त फलंदाज म्हणून संघात स्थान मिळत होते. पण हा खेळाडू खराब फलंदाजीही करत होता. त्यामुळेच हार्दिकने आता एक मोठे पाऊल उचलले असून त्याला फिटनेसमध्ये परतण्यासाठी थोडा वेळ हवा असल्याचे बीसीसीआयला सांगितले आहे.


 इंडिया डॉट कॉमच्या वृत्तानुसार, हार्दिकने सांगितले की, त्याला आता फलंदाज म्हणून नाही तर अष्टपैलू म्हणून संघात परतायचे आहे आणि त्यामुळेच तो आता संघातून वगळत आहे.


हार्दिक पांड्याच खराब प्रदर्शन


गेल्या काही महिन्यांपासून हार्दिक पांड्याला सतत टीकेला सामोरे जावे लागत आहे. पहिल्या IPL 2021 आणि नंतर T20 वर्ल्ड कपमध्ये हार्दिक पांड्याची कामगिरी खूपच खराब होती. हार्दिक पांड्याला गोलंदाजी किंवा फलंदाजी करता येत नव्हती. अशा स्थितीत त्याला वारंवार संधी दिल्याने संघ व्यवस्थापनावर टीका होत होती. मात्र, आता हार्दिक सलग दोन मालिकांमधून बाहेर होणार आहे.


दक्षिण आफ्रिकेचा दौरा धोक्यात 


भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा तरीही अडचणीत आला आहे. हा दौरा रद्द केला जाऊ शकतो. कारण सध्या दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचे नवीन प्रकार येण्याचा धोका आहे. हे पाहता तेथे खेळल्या गेलेल्या अनेक मोठ्या मालिका आणि स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. अशा स्थितीत भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा वेळेवर होण्याची शक्यता कमी आहे.