मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड नुकतीच 4 कसोटी सामन्यांची मालिक संपली. या मालिकेवर 3-1नं भारतीय संघानं दणदणीत विजय मिळवला आहे. त्यानंतर 12 मार्चपासून भारत विरुद्ध इंग्लंड 5 सामन्यांची टी 20 सीरिज खेळवली जाणार आहे. भारतीय संघातील वेगवान गोलंदाज काही कारणांमुळे संघातून बाहेर होण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय संघातील वेगवान गोलंदाज टी नटराजन जखमी झाल्यामुळे पहिला टी 20 सामना खेळू शकणार नाहीत असं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारत विरुद्ध इंग्लंड होणारा टी 20 सामन्याच्या सीरिजमधील पहिला सामना खेळणार नाही.


ठरलं! 'या' मॉडेलसोबत जसप्रीत बुमराह बोहल्यावर चढणार


नटराजनच्या खांद्यामध्ये आणि गुडघ्याला जखम झाल्यामुळे तो खेळू शकणार नाही अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अद्यापही नटराजन पूर्णपणे फिट न झाल्यानं पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणं जोखमीचं आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमी नटराजन लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत. 


IPL 2021: 5 दिग्गज खेळाडू मिळून उडवणार IPLमध्ये 'धुरळा'


हार्दीक पांड्या भारतीय संघातून खेळणार


भारत विरुद्ध इंग्लंडच्या कसोटी मालिकेनंतर आता पुन्हा एकदा टी 20 सीरिजमध्ये खेळण्यासाठी उतरणार आहे. पांड्या संघात आल्यामुळे आता टी नटराजनची कसर पहिल्या टी 20 सामन्यातून भरून काढेल अशी आशा सर्वांना आहे. मोहम्मद शमी, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, शार्दूल ठाकूर, नवदीप सैनीचा देखील गोलंदाजांच्या यादीमध्ये सामावेश आहे.