दुबई : भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणीच असते. लोकांमध्ये प्रचंड उत्साह असतो. यावेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या आशिया चषकाच्या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार अवघ्या 10 धावांवर आऊट झाल्याने त्याला जोरदार ट्रोल केले गेले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या फ्लॉप फलंदाजीची चर्चा सोशल मीडियावर पसरली. बाबर आझमने आपल्या इनिंगमध्ये फक्त 9 चेंडू खेळले. बाद झाल्यावर सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यात आले.



सोशल मीडियावर बाबरच्या खराब कामगिरीमुळे पाकिस्तानातील जनता प्रचंड संतापलेली दिसत आहे. लोकांनी त्याला माजी कर्णधार विराट कोहलीसाठी केलेल्या एका ट्विटची आठवण करून दिली.



अनेक लोक सोशल मीडियावर मीम्स शेअर करतानाही दिसले. भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानचा संघ १४७ धावांत ऑलआऊट केला. टीम इंडियाकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. हार्दिक पांड्याने 3 विकेट्स घेतल्या. याशिवाय अर्शदीप सिंगने 2 आणि आवेश खानने 1 विकेट घेतली.