मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिकेत आज पाचवा T20 सामना रंगणार आहे. या सामन्याचा टॉस टीम इंडीयाचा कर्णधार रिषभ पंत पुन्हा हरला आहे. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकत फिल्डींगचा निर्णय घेतला आहे. तर टीम इंडिया प्रथम फलंदाजी करणार आहे. भारत पहिली फलंदाजी करून किती धावांचा डोंगर उभा करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाच सामन्यांच्या T20 मालिकेत दोन्ही संघ 2-2 ने बरोबरीत आहेत. पाचवा सामना दोन्ही संघासाठी निर्णायक असणार आहे. त्यामुळे या सामन्यावर कोणता संघ विजय मिळवतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


दक्षिण आफ्रिका टीम 


क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीजा हेंड्रिक्स, रस्सी वैन डेर डूसन, डेविड मिलर, हेनरिक क्लासेन, ट्रिस्टन स्टब्स, ड्वेन प्रिटोरियस, कैगिसो रबाडा, केशव महाराज (कप्तान), लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे


टीम इंडिया 
ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कॅन्डर वके), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, आवेश खान