मुंबई : भारत विरुद्ध श्रीलंका टी 20 सीरिजमधील पहिला सामना आज लखनऊ इथे खेळवण्यात येणार आहे. 6.30 वाजता संध्याकाळी टॉस होणार असून 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. या सामन्यासाठी नागरिकांना स्टेडियममध्ये परवानगी देण्यात आली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध पहिला टी 20 सामन्यासाठी आज मैदानात उतरणार आहे. आज मैदानात विराट कोहली, दीपक चाहर आणि सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे उतरणार नाही. मात्र असं असलं तरी तगडी टीम घेऊन रोहित शर्मा मैदानात उतरणार आहे.


2 धडाकेबाज क्रिकेटपटूंना टीम इंडियामध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे. हे खेळाडू संघात आल्याने टीम इंडियाची ताकद वाढली असून आता श्रीलंकेच्या खेळाडूंचं टेन्शन वाढलं आहे. 


विराट कोहलीच्या जागी श्रेयस अय्यर मैदानात उतरणार आहे. वेस्टइंडीज विरुद्ध तिसऱ्या टी 20 मध्ये 80 धावा अय्यरने केल्या होत्या. याशिवाय संजू सॅमसनला देखील संघात समाविष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे संघाला आता मजबूती देण्यात आली आहे.