मुंबई : वनडे सीरीजमध्ये वेस्ट इंडिजला 3-0 ने पराभूत केल्यानंतर आता टीम इंडिया 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत कॅरेबियन संघाशी भिडणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाला या मालिकेत आपल्या दोन सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांची नक्कीच उणीव भासेल. होय, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी वनडेनंतर टी-20 मालिकेतूनही बाहेर आहेत. पण कर्णधार रोहितकडे संघात आणखी दोन गोलंदाज आहेत जे बुमराह-शमीची जागा घेऊ शकतात. (Captain Rohit Sharma replaces Bumrah-Shami with 2 deadly bowlers)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुमराह-शमीला विश्रांती


टीम इंडियाचे दोन वरिष्ठ वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद शमी (Mohamad Shami) यांना वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. हे दोन्ही खेळाडू टीम इंडियासाठी दीर्घकाळ क्रिकेट खेळत आहेत आणि त्यांना यावेळी विश्रांतीची नितांत गरज होती. वेस्ट इंडिजसारख्या धोकादायक संघासमोर बुमराह आणि शमी यांची टीम इंडियाला नक्कीच उणीव भासेल. पण बुमराह आणि शमीचे पर्याय भारताकडे आहेत.


1. दीपक चहर


दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर अप्रतिम कामगिरी करणाऱ्या दीपक चहरला (Deepak Chahar) आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेतही संधी देण्यात आली आहे. या हुशार खेळाडूकडे चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करण्याची उत्तम कला आहे. भुवनेश्वर कुमारला संघातून वगळल्यानंतर जिथे स्विंग गोलंदाजाची गरज होती, तिथे आता दीपक हे काम चोख बजावेल. दीपक चहर बॉलसोबतच बॅटनेही खूप प्रभावी कामगिरी करतो. अलीकडेच IPL मेगा लिलावात दीपक चहरला CSK ने 14 कोटी रुपयांना विकत घेतले. त्याचबरोबर बुमराह आणि शमीच्या अनुपस्थितीत हा गोलंदाज चमत्कार करू शकतो.


2. शार्दुल ठाकूर


दीपक चहरसारखा आणखी एक महान अष्टपैलू खेळाडू संघात आहे, त्याचे नाव आहे शार्दुल ठाकूर. शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) बॉल आणि बॅट दोन्हीमध्ये अप्रतिम खेळ दाखवू शकतो. शार्दुलला दिल्ली कॅपिटल्सने मेगा लिलावात 10.75 कोटी रुपयांना विकत घेतले. शार्दुलचा खेळ काळानुसार चांगला होत आहे. कठीण प्रसंगी विकेट घेणे ही शार्दुलची सर्वोत्तम कला आहे. शार्दुल हा संघाचा सर्वात मोठा एक्स फॅक्टर आहे आणि तो शेवटी येतो आणि बॅटने लांब शॉट्स खेळतो.


भारताचा T20 संघ:


रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, अवेश खान, हर्षल पटेल, ऋतुराज गायकवाड आणि दीपक हुडा.